बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे २०१४ साली घडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील सर्व सात खटल्यांचा शेवट अखेर झाला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईत ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
२७ जुलै २०१४ रोजी फलक हटविल्यानंतर पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी पाच खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले होते, तर उर्वरित दोन खटल्यांचाही निकाल आता ग्रामस्थांच्या बाजूने लागला आहे.
या प्रकरणात अनेक निरपराध ग्रामस्थांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. पोलिसांच्या कारवाईनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र न्यायालयाच्या निकालामुळे सर्व आरोपी निर्दोष ठरले असून, मराठी भाषिकांच्या एकजुटीचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या दीर्घ लढ्यात काही जणांचे निधन झाले, तर काही आरोपींची नावे अनुपस्थितीमुळे वगळण्यात आली. या प्रकरणात वकिलांनी सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला.

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; 10 वर्षांची लढाई संपली
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
