बेळगाव : महाजन अहवाल आणि त्यावर आधारित ठरावाच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, यावर राष्ट्रीय पक्षांतील मराठी नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी शुभम शेळके यांनी केली आहे.
शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना महाजन ठरावावर तीव्र नाराजी व्यक्त करत, हा ठराव म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला. मराठी भाषिकांच्या भावनांना डावलून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेस व भाजपमधील मराठी नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.
“महापालिकेत मराठी प्रश्नावर ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठी अस्मितेवर कुठलाही घाव सहन केला जाणार नाही,” असा इशारा शेळके यांनी दिला. तसेच, 58 पैकी 55 नगरसेवकांनी ठरावाला समर्थन दिल्याच्या दाव्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मराठी भाषिक नागरिकांच्या हक्कांसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षनिष्ठेपेक्षा जनतेच्या भावनांना प्राधान्य द्यावे आणि महापालिकेत ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन शेळके यांनी यावेळी केले.

महाजन ठरावावरून शेळकेंचा हल्लाबोल; “लोकशाहीची हत्या” असा आरोप
Related Posts
30 मार्च रोजी सार्वत्रिक सुट्टी असल्याने एसएसएलसी अर्थात इयत्ता दहावीची तृतीय विषयाची परीक्षा मंगळवार दि. 31 मार्च रोजी घेतली जाणार
Spread the loveबेळगाव : भगवान महावीर जयंती निमित्त सरकारने सोमवार दि. 30 मार्च रोजी सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी होणारी एसएसएलसी अर्थात इयत्ता दहावीची तृतीय विषयाची परीक्षा…
मुतगे येथे पारंपरिक उत्साहात श्री महालक्ष्मी देवी यात्रेला प्रारंभ
Spread the loveमुतगे : पाच वर्षांतून एकदा मोठ्या भक्तिभावाने साजरी होणारी श्री महालक्ष्मी देवी यात्रा यावर्षीही गावात उत्साहात सुरू झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच गावातील विविध देवदेवतांची विधीपूर्वक पूजा-अर्चा करण्यात आली.…
