मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संघटनात्मक शक्ती असून, समाजाला राजकीयदृष्ट्या पोखरण्याचा प्रयत्न कोणीही केला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा मराठा समाजाचे गुरु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी दिला. सकल मराठा समाज बेळगावचे नेते किरण जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाज नेहमी हिंदुत्व आणि सामाजिक कार्यात आघाडीवर राहिला असून, मात्र राजकीय लाभांच्या बाबतीत तो मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात विविध राजकीय पक्षांत विखुरले गेलेले मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींना एकत्र करून संघटित ताकद उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या सुख-दुःखात सहभागी राहणारे नेतृत्वच समाजाचा खरा विश्वास संपादन करू शकते, असे सांगत स्वामीजींनी संघटन, संवाद आणि एकजूट हाच पुढचा मार्ग असल्याचे ठामपणे नमूद केले.

मराठा समाजाला राजकीय ठोकर दिल्यास चोख उत्तर – श्री मंजुनाथ भारती स्वामीजी
Related Posts
30 मार्च रोजी सार्वत्रिक सुट्टी असल्याने एसएसएलसी अर्थात इयत्ता दहावीची तृतीय विषयाची परीक्षा मंगळवार दि. 31 मार्च रोजी घेतली जाणार
Spread the loveबेळगाव : भगवान महावीर जयंती निमित्त सरकारने सोमवार दि. 30 मार्च रोजी सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी होणारी एसएसएलसी अर्थात इयत्ता दहावीची तृतीय विषयाची परीक्षा…
मुतगे येथे पारंपरिक उत्साहात श्री महालक्ष्मी देवी यात्रेला प्रारंभ
Spread the loveमुतगे : पाच वर्षांतून एकदा मोठ्या भक्तिभावाने साजरी होणारी श्री महालक्ष्मी देवी यात्रा यावर्षीही गावात उत्साहात सुरू झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच गावातील विविध देवदेवतांची विधीपूर्वक पूजा-अर्चा करण्यात आली.…
