बेळगाव : वडगाव येथील रयत गल्ली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी मंगळवारी थेट घागरी डोक्यावर घेऊन बेळगाव महानगरपालिकेवर मोर्चा काढत धडक दिली. पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, अन्यथा मनपा कार्यालयासमोरून हलणार नाही, असा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
परिसरातील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाले असून त्यामुळे नागरिकांसह जनावरांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून याबाबत महानगरपालिकेला अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या वेळी शेतकरी राजू मर्वे यांनी पाण्याअभावी नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणी आणि वेदना मनपा आयुक्तांसमोर मांडल्या. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करत त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बेळगाव शहरातील पाणी वितरणाचे काम सध्या एल अँड टी कंपनीकडे असून रयत गल्लीतील पाणीपुरवठाही त्यांच्याकडूनच केला जातो. मात्र पंधरा दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. तसेच या प्रश्नाकडे स्थानिक नगरसेवक उदय उपरी यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.


रयत गल्लीतील महिलांचा घागर मोर्चा; पंधरा दिवसांपासून पाणी टंचाई
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
