बेळगाव: एपीएमसी सगटू भाजी मार्केट आणि जाई किसान खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बेंगळुरू येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, बेळगाव एपीएमसी सगटू भाजी मार्केटला देशभरात चांगली ओळख असून ती टिकवण्याची जबाबदारी दोन्ही बाजार समिती व व्यापाऱ्यांची आहे. या प्रश्नावर कृषी बाजार मंत्री शिवानंद पाटील यांच्यासमवेत बेंगळुरू मध्ये सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खासगी मार्केटमधून एपीएमसी आवारात स्थलांतरित झालेल्या व्यापाऱ्यांना रिक्त गाळे वाटप करण्याच्या सूचना एपीएमसी सचिवांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी कार्यक्षेत्रात पूरक सगटू भाजी मार्केट उभारण्याबाबतही शासन पातळीवर चर्चा करू, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले.
ही समस्या तात्काळ सुटणारी नसून दोन्ही बाजारातील व्यापाऱ्यांनी समन्वयाने व्यवसाय करावा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांसह संबंधित अधिकारी व व्यापारी उपस्थित होते.


व्यापाऱ्यांच्या समस्येसाठी उच्चस्तरीय बैठक; शेतकरी हिताला प्राधान्य
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
